सन १९६५ साली सुधारीत महाराष्ट्र नगरपालिका अधिनियम १९६५ हा अमलात आला. या अधिनियमांच्या प्रकरण ४ (नगरपालिका प्रशासन आणि जिल्हाधिकारी) यातील कलम ७४ मध्ये या अधिनियमानुसार स्थापित नगरपरिषदा व नगरपंचायतीच्या कामकाजावर नियंत्रण व पर्यवेक्षण यासाठी नगरपालिका प्रशासन शाखेची तरतूद करण्यात आलेली आहे. अधिनियमातील इतर विविध कलमात विविध जबाबादारी तसेच अधिकार यासंबंधी तरतुदी विहीत करण्यात आलेले आहेत, तसेच राज्य व केंद्र शासनाच्या मार्फत नागरी क्षेत्रासाठी राबविण्यात येणारे नागरी दारिद्र निर्मूलन, पायाभूत सुविधा, नागरी सेवा व प्रशासन सुधारणा, सार्वजनिक आरोग्य तसेच पर्यावरण या संबंधी अभियान / कार्यक्रम अंमलबजावणी संबंधी विविध जबाबदाऱ्या या विभागास सोपविलेल्या आहेत.
सन १९९२ मध्ये मंजूर होवून सन १९९३ मध्ये अंमलात आलेल्या ७४ घटना दुरुस्ती नुसार नागरी स्थानिक संस्थांना घटनात्मक दर्जा प्राप्त झाला, तसेच त्यांचे वरील विविध जबाबदारी तसेच त्यांचे अधिकार यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली, या घटना दुरस्तीच्या अनुषंगाने सन १९९४ मध्ये अधिनियमात नगरपरिषदांचे कर्तव्य, अधिकार, निवडणुका इ. बाबतच्या तरतुदीत विविध सुधारणा करण्यात आल्यात तसेच राज्य वित्त आयोग, राज्य निवडणूक आयोग यासंबंधी तरतूदी समाविष्ट करण्यात आल्यात. तसेच केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारसी नुसार स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात अनुदानाची मागणी, वितरण व वापर यावर नियंत्रण तसेच या अनुदानाच्या अनुषंगाने केंद्र शासनाने वेळोवेळी निश्चित केलेल्या सुधारणा कार्यक्रमाची अंमलबजावणी करून घेण्याची जबाबदारी नगर पालिका प्रशासन शाखे कडे आहे.
संपर्क साधा -:
दूरध्वनी क्रमांक: 07252 234239
ई-मेल: washimdao@gmail.com
